प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या, ज्यांच्या हाती फक्त शुन्य होते..
*"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या, ज्यांच्या हाती फक्त शुन्य होते..."*
वडील नावाडी होते. विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते.
ते शास्त्रज्ञ झाले राष्ट्रपती झाले.
खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण लिहिले..
फाळणी
नंतर दिल्लीला आले.मोटार गँरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल राँय
भेटले .मोटार गँरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले...
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .
भटकंतीतून त्यांना सुर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले ....
पुण्याला
काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते
राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला
माहीत झाले...
घोड्याच्या
पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच
स्वत:चा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...
पंजाबमधल्या
एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला जात
होते. गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या
जिंकल्या. चित्रपटात कामे केली. राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच
भावना होती , एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...
मुंबईच्या
फुटपाथवर सीनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे शंभर
कोटींना विकली गेली. भारतात चिञकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला
गेला....
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते. कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....
गरीब
शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी
लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे
उघडले ....
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...
सोलापूरला कोर्टात शिपाई होते.
कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..
अहमदनगर
जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता
त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी
साखर कारखान्याची स्थापना केली ....
वडिल
प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला
होता. स्वत: ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी
करत होते.
अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक 'अँपल'
ची स्थापना केली....
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....
बस
कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे
लोंकानी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर
स्थिरावला....
ड्रायव्हर
होता. चलतीका नाम गाडी, सबसे बडा रुपया त्याने म्हणायला सुरुवात केली आणि
गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वताःलाही समजले नाही.....
"या
सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते . त्यांनी अथक परिश्रमाने
शुन्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला, परिस्थितीशी
झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला ..
तुम्हीसुध्दा शुन्य असताना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण करु शकता....."
Comments
Post a Comment