Posts

Showing posts from July, 2018

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

हल्ली रोज फेसबुकवर कोणाच्या ना कोणाच्या वॉल वर काही हास्यास्पद पोस्ट पाहायला मिळतायत. 'झुक्या भाऊ तुमच्याबद्दल काय म्हणतो' , 'मुली तुम्हाला बघून काय म्हणतात' , 'तुमचा मृत्यू कसा होईल' , 'किती मार खाल्ला आत्तापर्यंत तू भावड्या' , 'तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात असता तर' इथपर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फेसबुकवर शेअर केली जातायत. साला म्हटलं हे येत कुठून म्हणून थोडा शोध घ्यायच ठरवलं. त्या उत्तरावर क्लीक केलं तर त्या पेज वरून malluapps. net ला रीडायरेक्ट केलं गेलं. तिथे असलेच काहीसे प्रश्न आणि त्यांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटने लॉगिन करायचं होतं. आता मात्र डोक्यात किडा वळवळायला लागला आणि कुतूहलापायी malluapps. net ची कुंडली काढायची ठरवली. समोर आलेली माहिती खालीलप्रमाणे: + त्या पेजचे एकूण लाईक्स : ५,४७,००० + डोमेन एज : १ वर्ष ३९ दिवस + दररोज भेट देणारे(Daily Visitor) : १,७५,२९० + दररोज नवीन भेट देणारे(Daily Unique Visitor) : ३५०६ + जाहिरातीतून मिळकत(Advertisement Income) :  प्रतिदिवशी (Daily...

असा असावा थंडीतला आहार

Image
_*असा असावा थंडीतला आहार*_ _*LetsUp I Health Tips*_ आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्याचा मोसम म्हणजे आल्हादायक काळ असतो. यामुळेच हा काळ आरोग्य कमावण्यासाठी योग्य मानला जातो. कारण या दिवसात भाज्या, फळेही भरपूर आलेली असतात. म्हनुनच हिवाळ्यात आरोग्यदायी आहार नेमका कसा घ्यावा त्यावर एक नजर... हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. मांसाहारी व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये आहारात मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा. आहारामध्ये तीळ, लसून, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र इ. मसाला वापरावा. त्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे लसणाची, तिळाची चटणी करावी. बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्...

खरंच आपण राग, लोभ, मद, मत्सर सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध टिकवण्यावर भर दिला पाहीजे.

घरात डबा भरुन खिळे असतात. त्यापैकी एक खिळा 'कालनिर्णय' भिंतीवर लावण्यासाठी आपण उचलतो. तो ठोकता ठोकता वाकडा होतो.  तर आपण तो वाकडा झालेला खिळा फेकुन देत नाही. बोटांवर हातोडीचे एक-दोन फटके बसले तरी चालतील, पण तोच वाकडा खिळा सरळ करुन आपल्याला परत वापरायचा असतो.  हाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी सकारण-अकारण वाकडं झालंय, ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर? खरंच आपण राग, लोभ, मद, मत्सर सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध टिकवण्यावर भर दिला पाहीजे. *जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा*

छत्रपती श्री. संभाजी महाराजांचा मृत्यू

छत्रपती श्री. संभाजी महाराजांचा मृत्यू :-  वय किमान ७० च्या वर असा एक मुघल सम्राट औरंगजेब हा त्या वेळी दिल्लीच्या तख्तावर बसून संपूर्ण हिंदुस्थानावर आपली हुकुमत गाजवीत होता.                    त्या वेळी मराठ्यांचे छत्रपती छत्रपती श्री. संभाजी राजे होते. त्यांचे वय किमान ३२ वर्षे त्या काळी छत्रपती श्री. संभाजी राज्यांनी १२० लढाया केल्या होत्या. त्या मधून ते एकही लढाई हरले नव्हते. अश्या वीर योद्ध्याला पकडणे औरंगजेबला शक्य नव्हते. म्हणूनच औरंगजेब शस्त्र होऊन सोबत किमान ४ लाख सैन्याला घेऊन तो दक्खन मध्ये उतरला. त्याचे एक स्वप्न होते की त्याला काबुल पासून ते दक्खन पर्यंतचे संपूर्ण क्षेत्र मुघलांच्या ताब्यात घ्यायचे होते. पण त्याचे हे स्वप्ने पूर्ण झालेच नाही . कारण छत्रपती श्री. शिवाजी महाराजांनी असे होऊच दिले नाही. आणि म्हणून तो निराश झाला होता. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे निधन १६८० ला ५० व्या वर्षी झाल्या नंतर सन १६८१ ला छत्रपती श्री. संभाजी राजे मराठ्यांचे छत्रपती झाले. मग औरंगजेबाने निश्चय केला की काही झाला तर...

कसलं भारी होतं जीवन, नव्हती कसली भ्रांत.. पैसे नसत बाबांकडे तरी ते दिसत शांत..

कसलं भारी होतं जीवन, नव्हती कसली भ्रांत..  पैसे नसत बाबांकडे तरी ते दिसत शांत.. रिकामे डबे आई कधी  आदळत  ही नसे.. तेल नसे भाजीला तरी चव अविट असे.. चपाती तर घरी  पाहूणे अल्यास कधीतरी व्हायची ती खायला मिळणार  या आनंदातही तृप्ती असायची.. सगळ्या मोसमातील रानमेवा कोणीतरी आणून द्यायचे.. आई बसायची वाटायला तरी रूसण्याच कौतुक असायचे.. डोळे मिचकावत चिंचा खाताना गप्पा किती रंगत.. चटणी भाकरीची मग  बसे अंगत पंगत धो धो पाऊस कोसळताना मुद्दामच भिजायचं आजीच्या सुती लुगड्यान मग ओल डोक  पुसायच.. कुडकुडणार्या थंडीत चुलीचीच  शेकोटी असायची  विश्वाचं ज्ञान देत मग आई भाकरी थापायची.. एकच स्वेटर दर वर्षी  जपून ठेवला जायचा.. खुपच लहान झाला तर  लहान भावाला द्यायचा.. उन्हाळ्याच्या सुट्टयात  सगळे आंबे खायला जमत.. खोल्या भरून आंबे असतानाही पाडाच्या अंब्यासाठी भांडणे जुंपत.. काहीच नव्हतं जवळ तरी  माणस खुप श्रीमंत होती.. गरीबीत जगतानाही   माणसात माणूसकी ह...

स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा टाईमपास

'स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा टाईमपास ' हा आपला लेख वाचला. लेखाच्या शीर्षकावरुन एका चांगल्या विषयाला आपण हात घातला असे वाटले. पण, नंतर माझी निराशाच झाली. अख्ख्या महाराष्ट्रात गावोगावी, सर्व महाविद्यालयांमध्ये, जिकडेतिकडे स्पर्धा परीक्षांचे गुणगान केले जात आहे. माफ करा साहेब, पण त्याचीच री तुम्ही ओढली. या परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उत्तीर्ण न होण्याचं खापर तुम्ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्याच डोक्यावर फोडलं. विद्यार्थी सोळा तास अभ्यास करत नसल्यामुळे ते या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत नाहीत असे आपले म्हणणे आहे.  प्रकाश भोसले साहेब, तुम्ही अतिशय तर्कशुद्ध लिहिता म्हणून तुम्ही माझा मुद्दा समजून घ्याल अशी मला आशा आहे. माझ्या माहितीप्रमाणे युपीएससीच्या दरवर्षी ११०० च्या जवळपास जागा असतात. गेल्या सात-आठ वर्षांपासून महाराष्ट्राचे १०० ते १२५ मुलं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या १० टक्के आहे व हे उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाणही १० टक्के आहे. याचा अर्थ मराठी मुले यात मागे नाहीत.  यापेक्षाही जास्त प्रमाण वाढलं तर  ...

छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास प्रसिद्ध जिंजीचा प्रवास ! रायगड ते जिंजी एक खडतर प्रवास...!

छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास प्रसिद्ध जिंजीचा प्रवास !  रायगड ते जिंजी एक खडतर प्रवास...! आदिलशाही व कुतुबशाही एकेका वर्षाच्या अंतराने गिळंकृत केल्यावर आलमगीर बादशाह औरंगजेबाची भूक प्रचंड वाढली होती आता त्याच्यासमोर मराठ्यांशिवाय एकही शत्रू दख्खनेत उरला नव्हता.... पूर्ण ताकदीनिशी त्याने मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली स्वराज्य चहुबाजूने वेढले गेले होते छत्रपती संभाजी महाराज निकराची झुंज देत होते. पण औरंग्यारूपी काळाने आपला डाव साधला.... ४ फेब्रुवारी १६८९  रोजी शेख निजामाने संगमेश्वर इथे संभाजी महाराजांना अटक केली तो त्यांना त्वरेने घाटमाथ्यावर नेऊन पुढे औरंगजेबाच्या छावणीकडे दौडत होता इकडे मराठ्यांच्या गोटात हाहांकार उडाला होता.... त्या चकमकीत सेनापती म्हालोजी घोरपडे ठार झाले तर त्यांचे पुत्र संताजी घोरपडे व त्यांचे दोन बंधू तसेच खंडो बल्लाळ चिटणीस आदी मातब्बर असामी रायगडाच्या दिशेने निघाले एक दोन दिवसातच राजधानी रायगडावर छत्रपतींच्या अटकेची बातमी विजेच्या लोळाप्रमाणे येऊन कोसळली.... यावेळी रायगडावर मराठ्यांची महाराणी येसूबाईसाहेब आ...

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत    https://drive.google.com/folde rview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZE blNDbFk&usp=sharing 1. अफझलखानाचा वध 2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास 3. आज्ञापत्र 4. आसे होते मोगल 5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार 6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा 7. औरंगजेबाचा इतिहास 8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र 9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास 10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८ 11. घोरपडे घराण्याचा इतिहास 12. छत्रपती शिवाजी महाराज 13. तंजावरचे मराठे राजे 14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१ 15. तेरा पोवाडे 16. दंडनीती 17. दिन-विशेष 18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास 19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक 20. पवनाकाठचा धोंडी 21. पानिपतची बखर 22. पुणे अखबार भाग १ 23. पुणे अखबार भाग 2 24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २ 25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३ 26. पेशवाईचा मध्यान्ह 27. पेशवाईची प्राण...

अक्कल बडी या भैंस (चर्चा) बडी ...

✍ अक्कल बडी या  भैंस (चर्चा) बडी ...         आजकाल डिग्री घेतलेली व्यक्ती हुशारच असते असा समज आहे. पण असे काही नाही.  कधी कधी कोणतेही शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा आपल्या अनुभवाने व व्यवहारी दृष्टिकोनाने असा काही चमत्कार घडवू शकतात, की ज्याने अनेक न सुटणाऱ्या समस्या  सोडवु शकतात,      मुंबईतील एका कंपनीने अवाढव्य यंत्र जर्मनी मधुन मागवले होते. ते यंत्र कंपनीच्या तळघरात  उतरवायचे होते. त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती.  मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या.  माथाडी कामगारांनी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल..... ... पण ते तळघरात ३६ फुट खोल ठेवायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ विचार करीत बसले होते.  अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.पण त्यासाठी किमान २ आठवडे इतका तरी वेळ लागणार होता....... माथाडी कामगार ही मजा पाहत होता. तो म्हणाला, ''साहेब मला आणी माझ्या माणसांना कशापायी इथे थांबवुन ठेवलय.....?'' त्याला सगळी परिस्थीती...

बॅकसीट... प्रत्येक गाडीला असतेच... त्यात काय विशेष ?तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या गाडीला टर्न द्यायचा असेल

Image
बॅकसीट                      बॅकसीट... प्रत्येक गाडीला असतेच... त्यात काय विशेष ? आता जरा लक्ष द्या...  आपल्या गाडीची बॅकसीट नजरेसमोर आणा...  आठवा बरं कोण-कोण बसतं तुमच्या बॅकसीटवर... ताई, दादा, आई, बाबा, मित्र-मैत्रिणी, इ. तुम्ही एक स्टेटस वाचलं असेल... With Mom - 20 km/hr.. With Friends - 80 km/hr & Alone 120+... झिंगाट तुम्ही आईला बॅकसीटवर घेऊन कधीच कट मारत नाही जाणार.... तेच जर सोबत मित्र असतील तर फुल्ल मस्ती... तेच जर कोणी खास असेल तर साधा खडासुद्धा लागू देत नाहीत ... अन् एकटे असल्यावर तर वार्यावर स्वार... बघा ड्राईव्हर तुम्हीच पण तुमची बॅकसीट ठरवते तुम्ही गाडी कशी चालवणार ते....   आहे की नाही गंमत...! आयुष्यपण असेच असते... बघा हं... तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव टाकणारी व तुमच्यावर अवलंबून असणारी माणसं हीच तुमची  बॅकसीट...यामध्ये तुमचे आई-बाबा, ताई-दादा, नवरा/बायको-मुलं असे सर्व... तुम्ही एक जरी योग्य किं...

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.  यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.   नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.  सकारात्मक विचार आपली शक्ती,  आत्मविश्‍वास,  मनोबल वाढवतात.  नकारात्मक विचारांना -  सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’! *थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?  थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन) *नेपोलियन* समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,  छाती चिखलाने माखली.   तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.  आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,  आपली मुंडकी उड...

छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले

छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले सर्व धातू पात्रांचा वापर बंद केला मृत्तिका पात्र  आणि फक्त दूध घेऊ लागले. चाफळला होते. गडावर जाण्याचा संकल्प केला कारण चाफळला काही झाले तर स्वामींच्या नादात भक्तगण रामाचे वैभव विसरतील. रघुपतीपेक्षा लोक माझे महत्व वाढवतील म्हणून गडच ठीक. रामाचा निरोप घेतला मागणे मागितले. या देहाकडून सेवा घेतलीस. मीही ती केली. आता एक मागणे आहे. आहे एकचि मागणे। कृपा करोनि देणे ।ज्यासी दर्शनाची इच्छा ।त्याची पुरवावी ।आस्था  ।  बरोबर उद्धव स्वामी होते. स्वतःसाठी काही नाही. राघवाने मागणे मान्य केले पण अट घातली. तेरा अक्षरी या मंत्राचा। जप करील जो साचा ।त्याची संख्या तेरा कोटी । होता भेटेन मी जगजेठी । समर्थ चफळकरांचा निरोप घेऊन गडावर आले. कल्याण डोम गावाला परत गेले. जवळची माणसे जवळ असली कि जाण्यात अडचण येते चाफळ मठाची व्यवस्था लावून दिली. उद्भवला वाटले नंतर भांडणे नको पण ही निरवानिरव लक्षात आली नाही. अक्का अस्वस्थ होत्या. काही विचारले तरी रघुरायाची इच्छा म्हणत. माघ पौर्णिमा नवान्न पौर्णिमा पण पुरण वरण ग...

मुतखडा म्हणजे काय? मुतखडा किती मोठा असतो, कसा दिसतो, तो मुत्रमार्गात कुठे दिसू शकतो?

मुतखडा म्हणजे काय? मुतखडा किती मोठा असतो, कसा दिसतो, तो मुत्रमार्गात कुठे दिसू शकतो? काही व्यक्तींत विशेष करून मुतखडा का दिसून येतो? मुतखडा होण्याची मुख्य कारणे कोणती? मात्र अनेक जणांमध्ये पुढील कारणांमुळे मुतखडा तयार होण्याची शक्यता असते मुतखड्याची लक्षणे मुतखड्यांच्या वेदनांची विशिष्ट लक्षणे मूतखड्यामुळे किडणी खराब होऊ शकते का? मुत्रमार्गातील मुतखड्याचे निदान मुत्रमार्गाच्या मुतखड्यावरील उपचार मुतखडा एकदा नैसर्गिक रुपात किंवा उपचारांद्वारे निघून गेल्यानंतर या आजारापासून संपूर्णपणे मुक्ती मिळते का? पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून रोग्याने कुठली काळजी घ्यावी आणि पथ्य पाळावे? जास्त प्रमाणात पाणी पिणे आहार नियंत्रण औषधाने उपचार मुतखड्याचा आजार हा पुष्कळ रोग्यांमध्ये दिसून येणारा किडनीचा एक महत्वपूर्ण रोग आहे. मुतखड्यामुळे असह्य वेदना , लघवीत संसर्ग आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.त्यामुळेच मूतखड्याबद्दल तसेच तो थांबवण्यात उपाय जाणून घेणे गरजेचे आहे. मुतखडा म्हणजे काय? लघवीत कँल्शीयम औक्झलेट किंवा इतर क्षारकण(Crystals) एकमेकांच्यात मिसळल्यानंतर काही काळानं...

दिक्कालाला भेदून जाणाऱ्या युगपुरुषांमध्ये ज्यांची नि:संशय गणना होते, त्या सावरकरांचे स्मरण

  दिक्कालाला भेदून जाणाऱ्या युगपुरुषांमध्ये ज्यांची नि:संशय गणना होते, त्या सावरकरांचे स्मरण आम्ही का करावे? आमच्या पारतंत्र्यात वाटयाला येणारे छळाचे जास्तीत जास्त हलाहल त्यांनी पचविले, त्याची कृतज्ञता म्हणून? त्यांनी आमच्यावर केलेल्या ऋणातून उतराई व्हावे म्हणून? की त्यांचे स्मरण करून आम्ही त्यांचा गौरव करतो आहोत असे आम्हांस वाटते म्हणून?    फाल्गुन शुध्द षष्ठी शके 1887, अर्थात दि. 26 फेब्रुवारी 1966! त्या दिवशी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्राप्तव्य आणि कर्तव्याच्या पूर्तीच्या समाधानात आपली जीवनयात्रा संपविली. ब्रह्मवेत्ते योगी उत्तरायणात, शुक्लपक्षात आणि भर दिवसा म्हणजे सूर्यनारायणाला साक्ष ठेवून देहविसर्जन करतात असे भगवद्गीतेत सांगितले आहे. गीतेने सांगितलेला कर्मयोग जन्मभर आचरणाऱ्या सावरकरांनी मृत्यूच्या बाबतीतही आपला नेम चुकविला नाही. ज्याला आयुष्यभर हुलकावणी दिली, त्या मृत्यूचाच हात धरून सावरकरांनी त्याला आपल्याजवळ ओढले. तेवीस दिवस प्रायोपवेशन करून मृत्युंजय वीराने मृत्यूला कवटाळले. सावरकरांना जाऊन पन्नास वर्षे झाली आहेत....

चांदवड चा इतिहास

चांदवड चा इतिहास  नाशिकहून ६० किलोमीटरवर मुंबई-आग्रा रोडलगत वसलेल्या चांदवडमध्ये प्रवेश करताना सह्याद्री पर्वत श्रेणीतील सातमाळ डोंगर रांग आपल्यासोबत धावत असल्याचा अनुभव घेता येतो. उजव्या हाताचा धोडपही आपल्याबरोबर धावण्याची स्पर्धा करतो. शहरात प्रवेश करताच नजरेत भरणारा चांदवड किल्ला आपले स्वागत करतो. मुंबई-आग्रा रोडवरील घाटावर बांधलेला हा किल्ला पुणे, नाशिक, मुंबई व विदर्भात जाणारे सगळे रस्ते अडवून शत्रूची कोंडी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असे. म्हणूनच चांदवडच्या किल्ल्याबाबत असे म्हटले जाते की, 'या किल्ल्याने आपली टांग एखाद्या गोष्टीत टाकली तर ते काम कधीच पूर्ण होत नाही.' चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे ते चांदवड. मात्र आता वडांची संख्या खूप कमी दिसते. चांदवड नगर इ. स. ८ व्या शतकाच्या सुमारास वसले असल्याचा उल्लेख शनि महात्माच्या पोथीत आला आहे. त्यात चांदवडला ताम्रलींदापूर असे म्हटले आहे तर जैन साहित्यात चंद्रादिव्यपुरी म्हटले आहे. यादव घराण्यातील द्रढप्रहार राजाच्या काळात चांदवडला आर्थिक सुबत्ता मिळाली. या काळात चांदवडला चंद्रपूरही म्ह...